सीधे मुख्य सामग्री पर जाएं

अक्षयकल्प ऑर्गेनिकचा मुंबई आणि पुण्यात प्रवेश

दक्षिण भारतात सुरू झालेला भारताचा आघाडीचा प्रमाणित ऑर्गेनिक डेअरी ब्रँडचा प्रवास आता महाराष्ट्रासह राष्ट्रीय स्तरावर विस्तारत आहे 

मुंबई। भारतातील आघाडीचा प्रमाणित ऑर्गेनिक डेअरी ब्रँड (सेंद्रिय दुग्धजन्य उत्पादन ब्रँड) अक्षयकल्प ऑर्गेनिकने आज मुंबई आणि पुणे बाजारपेठेत अधिकृत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. दक्षिण भारतातील लोकप्रिय ब्रँडपासून संपूर्ण भारतातील घराघरात पोहोचण्याच्या त्यांच्या प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 2010 मध्ये स्थापन झालेल्या आणि स्वच्छ पोषण व शेतकरी सक्षमीकरण या दोन तत्त्वांवर उभारलेल्या अक्षयकल्प ऑर्गेनिककडून महाराष्ट्रात त्यांच्या प्रमाणित सेंद्रिय दुग्धजन्य उत्पादनांचा संपूर्ण संच उपलब्ध करून दिला जात आहे. यामध्ये दूध, तूप, दही, लोणी, पनीर, चीज, ताक तसेच त्यांची वेगाने वाढणारी उच्च-प्रथिनांची श्रेणी यांचा समावेश आहे. ही सर्व उत्पादने अँटिबायोटिक्स, कृत्रिम हार्मोन्स, कीटकनाशकांचा उरलेला साका किंवा गाळ, अन्न खराब होऊ नये, जास्त काळ टिकावे आणि त्याची गुणवत्ता कायम राहावी यासाठी वापरली जाणारी संरक्षक द्रव्ये आणि कृत्रिम अॅडिटिव्ह्सपासून पूर्णपणे मुक्त आहेत.

या विस्ताराची वेळ विशेष महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात दूध भेसळ आणि अन्नसुरक्षेबाबत चिंता अजूनही कायम आहे. त्यातून पारंपरिक दुग्ध पुरवठा साखळीत पारदर्शकता आणि अन्न किंवा दुग्धजन्य उत्पादन कुठून आले, कसे तयार झाले, कोणत्या टप्प्यांतून गेले याचा पूर्ण मागोवा घेण्यातील कमतरता ठळकपणे दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, वाहतुकीदरम्यान शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी काही वेळा हानिकारक पदार्थांचा वापर केला जातो. परंतु त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत गंभीर धोके निर्माण होतात. परिणामी, मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांतील ग्राहक दुधासारख्या दैनंदिन जीवनावश्यक गोष्टींसाठी स्वच्छ, पडताळणीयोग्य आणि विश्वासार्ह स्रोतांचा शोध घेत आहेत.

अक्षयकल्प ऑर्गेनिक बाकीच्यांपेक्षा वेगळे ठरते याचे कारण म्हणजे ट्रेसेबिलिटी, गुणवत्ता आणि केवळ उत्पादन घेणे नव्हे तर शेतजमीन आणि परिसंस्था अधिक सक्षम आणि टिकाऊ बनवणे हे उद्दिष्ट असलेली रीजनरेटीव्ह शेतीप्रती असलेली त्यांची सखोल बांधिलकी. दुधाचा प्रत्येक थेंब  प्रशिक्षित सेंद्रिय शेतकरी-उद्योजकांच्या नेटवर्कमधून मिळवला जातो आणि प्रत्येक टप्प्यावर कृत्रिम हस्तक्षेपाशिवाय प्रक्रिया केली जाते. ब्रँडचा दृष्टिकोन केवळ प्रमाणपत्रापुरता मर्यादित नसून मातीचे आरोग्य पुनर्संचयित करणारी, प्राण्यांच्या स्वास्थ्याला प्राधान्य देणारी आणि शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन आर्थिक स्थिरता निर्माण करणारी शेती व्यवस्था उभारण्यावर केंद्रित आहे. ग्राहकांसाठी याचा अर्थ त्यांना मिळणारे दूध कुठून येते आणि त्याची निर्मिती कशाप्रकारे केली जाते याबाबत असलेली संपूर्ण पारदर्शकता असा होतो. 

या विस्ताराबाबत बोलताना अक्षयकल्प ऑर्गेनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक शशी कुमार म्हणाले, “सेंद्रिय दुग्धशेती ही केवळ कल्पना नाही, तर ती एक विस्तारक्षम आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य मॉडेल आहे हे सिद्ध करण्यात आम्ही 16 वर्षे घालवली आहेत. त्यातून शेतकऱ्यांसाठी वास्तविक मूल्य आणि कुटुंबांसाठी खरी सुरक्षितता निर्माण होते. आमची बांधिलकी नेहमीच सोपी आणि साधी सरळ राहिली आहे. त्यात कोणतेही शॉर्टकट नाहीत, पळवाटा नाहीत. दक्षिणेत ग्राहक आमच्यावर विश्वास ठेवतात कारण आम्ही त्यांना स्पष्टपणे दाखवतो की त्यांचे दूध कुठून येते, ते कोण तयार करतो आणि ते कसे बनवले जाते. तोच विश्वास, पारदर्शकता आणि तडजोड न केलेली गुणवत्ता आम्ही आता मुंबई आणि पुण्यात आणत आहोत. हे केवळ नवीन बाजारपेठेत प्रवेश करण्याबद्दल नाही, तर अन्न कसे पिकवले जाते, कसे मिळवले जाते आणि कसे वापरले जाते यासाठी नवे मापदंड निर्माण करण्याबद्दल आहे.”

महाराष्ट्रातील प्रवेश हा देशभरातील मजबूत गतीच्या पार्श्वभूमीवर होत आहे. अक्षयकल्प ऑर्गेनिक चालू आर्थिक वर्षाचा शेवट 550–600 कोटी रु. उत्पन्नासह करण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्या उच्च-प्रथिनयुक्त दुग्धजन्य उत्पादनांना असलेली मजबूत मागणी आणि भारतीय महानगरांमध्ये स्वच्छ-लेबल अन्नपदार्थांचा वाढता अंगिकार याचे हे द्योतक आहे. हैदराबादमध्ये या ब्रँडने वार्षिक 70% पेक्षा अधिक वाढ नोंदवली आहे. त्यातून प्रगत शहरी बाजारपेठांमध्ये स्वच्छ दुग्धजन्य उत्पादनांची वाढती मागणी दिसून येते. मुंबई आणि पुण्यातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कंपनी 50 कोटी रुपयांची गुंतवणूक पायाभूत सुविधा, वितरण आणि प्रक्रिया क्षमतेत करत आहे. अक्षयकल्प ऑर्गेनिकच्या राष्ट्रीय विकास धोरणातील जे महाराष्ट्राचे महत्त्व यातून दिसून येते. 

अक्षयकल्प ऑर्गेनिकच्या मॉडेलचा केंद्रबिंदू म्हणजे त्यांचा फार्मर-एंटरप्रेन्योरशिप (शेतकरी -उद्योजकता) उपक्रम. हा उपक्रम छोट्या दुग्धशेतकऱ्यांना प्रशिक्षित सेंद्रिय उद्योजकांमध्ये रूपांतरित करतो. शेतकऱ्यांना योग्य माहिती, पशुवैद्यकीय सेवा, आर्थिक साक्षरता आणि प्रीमियम दरात खात्रीशीर खरेदीची हमी दिली जाते. त्यामुळे उत्पादक आणि ग्राहक दोघांनाही फायदा होणारी स्वयंपूर्ण व्यवस्था तयार होते. शहरी कुटुंबांसाठी अक्षयकल्प ऑर्गेनिकची निवड म्हणजे केवळ स्वच्छ दुग्ध उत्पादनांचा वापर करणे एवढेच नाही तर पर्यावरण संवर्धनाच्या जोडीला शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करणाऱ्या व्यवस्थेला पाठबळ देणे आहे. 

बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि आता मुंबई व पुणे या शहरांमध्ये कार्यरत असलेले अक्षयकल्प ऑर्गेनिक हळूहळू प्रादेशिक क्षेत्रात अग्रणी राहण्यापासून राष्ट्रीय ब्रँडकडे वाटचाल करत आहे. हा राष्ट्रीय ब्रँड विश्वास, शाश्वतता यावर आधारित असून प्रत्येक भारतीय कुटुंबापर्यंत स्वच्छ, अस्सल अन्न पोहोचवण्याच्या ध्येयाने प्रेरित आहे. 

अक्षयकल्पा ऑर्गेनिक : https://akshayakalpa.org/

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

सॅमसंगने शुभ अक्षय्य तृतीया सेलची घोषणा केली

बीस्‍पोक एआय होम अप्लायन्सेसवर आकर्षक उत्‍सवी ऑफर्स  मुंबई। सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आपल्या शुभ अक्षय्य तृतीया सेलची घोषणा केली आहे. या सेलच्या निमित्ताने सॅमसंगच्या बीस्‍पोक एआय होम अप्लायन्सेसवर आकर्षक उत्‍सवी ऑफर्स देण्यात आल्या आहेत. समृद्धी आणि नवीन सुरुवातीचा उत्सव साजरा करण्यासाठी डिझाइन केलेल्या या ऑफर्स ग्राहकांना खात्रीशीर बचतीसह दीर्घकालीन मूल्य प्रदान करतात, ज्यामुळे ग्राहकांना अधिक स्मार्ट आणि एआय आधारित जीवनशैलीकडे अपग्रेड करणे सोपे होईल. सॅमसंग आपल्या बीस्‍पोक एआय अप्‍लायन्‍सेसवर विशेष फायदे देत आहे, ज्यामध्ये रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, एअर कंडिशनर्स आणि मायक्रोवेव्हवर जवळपास २०,००० रूपयांपर्यंत कॅशबॅक ऑफरचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकांना एअर कंडिशनर्सवर ५ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी आणि सॅमसंग केअर+ अंतर्गत ५ वर्षांची विस्तारित वॉरंटी देखील मिळू शकते. ग्राहकांना मनःशांती मिळावी, दुरुस्तीचा अनपेक्षित खर्च कमी व्हावा आणि वस्तू खरेदीचा एकंदरीत अनुभव सुखद व्हावा, हा या फायद्यांमागचा उद्देश आहे. या शुभ अक्षय्य तृ...

अनन्या दत्ता मॉडेलिंग आणि जाहिरात विश्वातील एक सुप्रसिद्ध चेहरा आहे

मुंबई/कोलकाता। अभिनेत्री अनन्या दत्ता सध्या तिच्या आगामी हिंदी चित्रपट 'जिंदगी फिर भी खूबसूरत है' मुळे चर्चेत आहे, ज्याचे चित्रीकरण सध्या शांतीकेतन फिल्म्सच्या बॅनरखाली सुरू आहे. हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे, कारण ती सध्या केवळ हिंदी चित्रपटांवर लक्ष केंद्रित करत आहे. अनन्या दत्ताने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'नाटोबार नॉट आऊट' या बंगाली चित्रपटातून केली, ज्यात तिने ज्येष्ठ अभिनेत्री रायमा सेन आणि मून मून सेन यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारून आपले कौशल्य दाखवले. त्यानंतर, तिने 'गॉड ओन्ली नोज' आणि 'डन्नो व्हाय ३' सारख्या चित्रपटांमधील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि प्रत्येक भूमिकेत एक वेगळी छाप सोडली. अनन्या दत्ता यांची नाट्यक्षेत्रातही एक समृद्ध कारकीर्द आहे, जिथे त्यांनी भरत दाभोळकर यांच्या 'बॉटम्स अप गँग'सोबत 'ओह नो, नॉट अगेन' (१५० हून अधिक प्रयोग), 'मंकी बिझनेस' (१०० हून अधिक प्रयोग), 'फनी थिंग कॉल्ड लव्ह', 'गॉट टू बी ऐश्वर्या' आणि ...