सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सॅमसंगने शुभ अक्षय्य तृतीया सेलची घोषणा केली

बीस्‍पोक एआय होम अप्लायन्सेसवर आकर्षक उत्‍सवी ऑफर्स 

मुंबई। सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आपल्या शुभ अक्षय्य तृतीया सेलची घोषणा केली आहे. या सेलच्या निमित्ताने सॅमसंगच्या बीस्‍पोक एआय होम अप्लायन्सेसवर आकर्षक उत्‍सवी ऑफर्स देण्यात आल्या आहेत. समृद्धी आणि नवीन सुरुवातीचा उत्सव साजरा करण्यासाठी डिझाइन केलेल्या या ऑफर्स ग्राहकांना खात्रीशीर बचतीसह दीर्घकालीन मूल्य प्रदान करतात, ज्यामुळे ग्राहकांना अधिक स्मार्ट आणि एआय आधारित जीवनशैलीकडे अपग्रेड करणे सोपे होईल.

सॅमसंग आपल्या बीस्‍पोक एआय अप्‍लायन्‍सेसवर विशेष फायदे देत आहे, ज्यामध्ये रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, एअर कंडिशनर्स आणि मायक्रोवेव्हवर जवळपास २०,००० रूपयांपर्यंत कॅशबॅक ऑफरचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकांना एअर कंडिशनर्सवर ५ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी आणि सॅमसंग केअर+ अंतर्गत ५ वर्षांची विस्तारित वॉरंटी देखील मिळू शकते. ग्राहकांना मनःशांती मिळावी, दुरुस्तीचा अनपेक्षित खर्च कमी व्हावा आणि वस्तू खरेदीचा एकंदरीत अनुभव सुखद व्हावा, हा या फायद्यांमागचा उद्देश आहे.

या शुभ अक्षय्य तृतीया ऑफर्स ३१ मे २०२६ पर्यंत सॅमसंगडॉटकॉम, आघाडीचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म्‍स आणि भारतातील निवडक रिटेल आउटलेट्समध्‍ये उपलब्ध असतील.

सॅमसंगचे बीस्‍पोक एआय अप्‍लायन्‍सेस स्मार्ट, सर्वोत्तम आणि ऊर्जा-कार्यक्षम अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत. वैयक्तिक गरजांनुसार कूलिंग करण्यापासून कनेक्टेड होम मॅनेजमेंटपर्यंत या अप्‍लायन्‍सेसमध्‍ये प्रगत एआय आणि आकर्षक डिझाइनचे संयोजन आहे.

विश्वासार्हता वाढवण्यासाठी, सॅमसंगच्या २०२६ बीस्‍पोक एआय एअर कंडिशनर श्रेणीमध्ये स्मार्टथिंग्स होम केअर एकीकृत करण्यात आले आहे. हे एक प्रो-अॅक्टिव्ह मॉनिटरिंग आणि प्रतिबंधात्मक देखभाल सोल्यूशन आहे, जे अप्‍लायन्‍सच्या कामगिरीचा सतत मागोवा घेते, गॅस गळती किंवा फिल्टर साफ करण्याची गरज यांसारख्या संभाव्य समस्या शोधते आणि वापरकर्त्यांना अलर्ट करते.

एआय व्हिजन इनसाइड तंत्रज्ञान असलेले बीस्‍पोक एआय रेफ्रिजरेटर्स फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तू ओळखून आणि कनेक्टेड इकोसिस्टमशी विनासायासपणे एकीकृत होऊन किचनमधील अन्‍न व्यवस्थापन अधिक स्मार्ट करतात.

सॅमसंगच्या बीस्‍पोक एआय वॉशिंग मशिन्समध्ये एआय वॉश वैशिष्ट्य आहे, जे कपड्यांचे वजन व कापडाचा प्रकार स्‍मार्टपणे ओळखून पाणी, डिटर्जंटचा वापर आणि वॉश सायकल्सचे अचूक नियोजन करते, ज्यामुळे कपडे उत्तमरित्‍या स्‍वच्‍छ धुतले जातात.

या अप्‍लायन्‍सेसमध्‍ये सॅमसंगचे स्मार्टथिंग्स फॅमिली केअर हे विशेष वैशिष्‍ट्य देखील आहे, जे अॅक्टिव्हिटी नोटिफिकेशन्स, औषधांबाबत रिमाइंडर्स आणि लोकेशन-आधारित अलर्ट्स देते. यामुळे कुटुंबांना उत्तम काळजी, कनेक्टिव्हिटी आणि मनःशांती मिळण्यास मदत होते.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

प्रियंका अग्रवाल: मॉडेलिंगपासून चित्रपटांपर्यंतचा एक प्रेरणादायी आणि कठोर परिश्रमावर उभारलेला प्रवास

मुंबई। भारतीय चित्रपट, फॅशन आणि जाहिरात उद्योगातील आपल्या अष्टपैलू आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखली जाणारी प्रियंका अग्रवाल, या क्षेत्रात एक वेगाने उदयास येणारे नाव बनली आहे. मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून, प्रियंकाने आपले कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवली आहे. प्रियंका अग्रवालने विल्स इंडिया फॅशन वीक आणि लॅक्मे इंडिया फॅशन वीक यांसारख्या मोठ्या फॅशन इव्हेंट्समध्ये रॅम्प वॉक करून आपली प्रतिभा अगदी सुरुवातीच्या काळातच दाखवून दिली. त्यानंतर तिने अनेक नामांकित फॅशन डिझायनर्ससोबत काम केले आणि मॉडेलिंग उद्योगात आपले एक भक्कम स्थान निर्माण केले. आपल्या चित्रपट कारकिर्दीत, प्रियंका 'रेडिओ' (२०१५), '१९७१: बियॉन्ड बॉर्डर्स' (२०१७) आणि 'युद्धभूमी १९७१ भारत सीमा' (२०१८) यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिने '1971: बियॉन्ड बॉर्डर्स' या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता अरुणोदय सिंगच्या विरुद्ध मुख्य भूमिका साकारली, जिथे तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. प्रियांका अग्रवालने द...

'बोलो राधे राधे' मध्ये प्रसिद्ध गायकांचा सहभाग, चित्रपटाची आध्यात्मिक खोली अधिक दृढ करत आहे

लखनऊ/मथुरा। आगामी धार्मिक हिंदी चित्रपट "बोलो राधे राधे" प्रचंड चर्चेत असून, त्यामुळे त्याच्या भक्तीपूर्ण भावना अधिकच दृढ होत आहेत. आता या चित्रपटाशी एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक संबंध जोडला गेला आहे, कारण पूजनीय संत आणि भक्तीगायक श्री गुरु स्वामी रसराज कृष्णदास यांनी आपल्या सुमधुर आवाजाने चित्रपटाच्या संगीताला समृद्ध केले आहे. भक्ती परंपरेत खोलवर रुजलेल्या स्वामी रसराज कृष्णदास यांचे हे योगदान केवळ एक संगीत सहयोग म्हणून नव्हे, तर एक आध्यात्मिक समर्पण म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाच्या मूळ संदेशाला—भक्ती, सेवा आणि शाश्वत मूल्ये—अधिक सत्यता प्राप्त होते. चित्रपटाचे संगीत मन्न मिश्रा यांनी दिले आहे, जे पारंपरिक भक्ती संगीताची खोली आणि चित्रपटीय अभिव्यक्ती यांचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न करतात. गीते लेखक-दिग्दर्शक रवी भाटिया यांनी लिहिली आहेत. या दुहेरी जबाबदारीमुळे संगीत चित्रपटाच्या कथेला आणि भावनिक प्रवाहाला खोलवर जोडले जाते. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या सहयोगाला एक आशीर्वाद संबोधून कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांचा विश्वास आहे ...