सीधे मुख्य सामग्री पर जाएं

‘राजा शिवाजी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित: बंधुभाव, कुटुंब आणि हिंदवी स्वराज्याच्या गाथेची रोमांचक झलक

मुंबई। 'जिओ स्टुडिओज' आणि 'मुंबई फिल्म कंपनी' यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर लाँच सोहळा मुंबई मध्ये पार पडण्यात आला असून निर्मात्यांकडून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर, मराठी आणि हिंदी अशा दोन्हीं भाषांमध्ये, अधिकृतरित्या ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. रितेश विलासराव देशमुख यांनी दिग्दर्शन, अभिनय, लेखन आणि निर्मिती अशा सर्व जबाबदाऱ्या सांभाळलेला हा चित्रपट भारतातील सर्वश्रेष्ठ शूर योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. बाळ शिवाजी ते राजा शिवाजी पर्यंतच्या प्रवासात ‘हिंदवी स्वराज्य' स्वप्न उराशी बाळगून, ध्येयनिष्ठतेने प्रयत्न करण्याचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटात प्रचलित नसलेल्या पण अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक पैलूंना नव्या दृष्टिकोनातून सादर करण्यात आले आहे. ट्रेलरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या कार्यक्रमाला जिओ स्टुडिओजच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे, दिग्दर्शक-अभिनेता- लेखक रितेश विलासराव देशमुख, तसेच संजय दत्त, अभिषेक बच्चन, भाग्यश्री, जितेंद्र जोशी, जिनिलीया देशमुख आणि संगीतकार जोडी अजय-अतुल उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले आणि चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली.

या चित्रपटाचे दिग्दर्शक, मुख्य अभिनेता, लेखक आणि निर्माता रितेश विलासराव देशमुख म्हणतात, "जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलतो, तेव्हा त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाची आणि महानतेची व्याप्ती शब्दांत मांडणे खरोखरच कठीण होते. त्यांच्याबद्दलचा आपला आदर, श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करताना ते नेहमीच मनाच्या गाभाऱ्यातून उमटते. गेल्या दहा वर्षांपासून मी ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट साकार करण्याचा प्रयत्न करत होतो. अखेर २०२३ मध्ये जेव्हा आम्ही या प्रवासाची सुरुवात केली, तेव्हा मनात एक वेगळीच भावना होती. जणू खुद्द महाराजच सांगत होते, “आता तुझी वेळ आली आहे.” कारण केवळ स्वप्ने पाहून गोष्टी साकार होत नाहीत; त्यांना वास्तवात आणण्यासाठी भक्कम पाठिंबा आणि विश्वासाची गरज असते. तसेच ‘जिओ स्टुडिओज’ आणि ज्योती देशपांडे यांनी आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहून ते धाडस दाखवले, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, आम्ही जे स्वप्न पाहिले होते, त्याचा मान राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. एक संपूर्ण टीम म्हणून, आम्ही हा चित्रपट महाराजांच्या चरणी एक विनम्र अर्पण म्हणून सादर करत आहोत."

जिओ स्टुडिओजच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे यांनी सांगितले की, “कलाकारांचा संच आणि हृदयस्पर्शी संगीताच्या जोरावर, ‘राजा शिवाजी’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर तो भारताच्या आत्म्याचा, अस्मितेचा आणि समृद्ध इतिहासाचा भव्य घोष आहे. ‘जिओ स्टुडिओज’मध्ये आमची ध्येयवेडी वाटचाल नेहमीच अशा कथा साकारण्याची राहिली आहे, ज्या आपल्या मातीत खोलवर रुजलेल्या आहेत आणि तरीही जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला भिडतात. ‘धुरंधर’ या दुहेरी मालिकेच्या अभूतपूर्व यशाने हे ठामपणे सिद्ध केले आहे की, प्रभावी, स्वदेशी कथांशी प्रेक्षकांचे नाते अतूट असते. विशेषतः जेव्हा त्या निडरपणे आणि भव्यतेच्या परमोच्च स्तरावर मांडल्या जातात. ‘राजा शिवाजी’द्वारे आम्ही हीच परंपरा अधिक उंचीवर नेत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची कथा नव्या तेजाने सजीव करत आहोत. धैर्य, दूरदृष्टी आणि हिंदवी स्वराज्याचे अद्वितीय प्रतीक, ज्यांचा विराट वारसा आजही पिढ्यानपिढ्या प्रेरणेचा अखंड स्रोत आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “या दंतकथेच्या पाठीमागची मानवी कहाणी, त्यांची अप्रतिम रणनीतिक बुद्धिमत्ता आणि अदम्य शौर्य यांना तितक्याच ताकदीने उलगडण्याची आमची जिद्द होती. रितेश आणि त्यांच्या टीमने केवळ दृश्यवैभवापलीकडे जाऊन, एका नेत्याच्या घडणीचा प्रवास, त्यांची मूल्ये आणि त्यांना आकार देणाऱ्या शक्तींचा सखोल व प्रभावी वेध घेणारी कथा घडवली आहे. अस्सलता, अफाट भव्यता, दमदार कलाकारांचा ताफा आणि आत्म्याला भिडणारे संगीत यांच्या जोरावर ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट आमच्या भारतीय कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत तितक्याच ताकदीने आणि तितक्याच हृदयस्पर्शीपणे पोहोचवण्याच्या आमच्या अढळ वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हा केवळ एक सिनेमॅटिक अनुभव नाही, तर भारताच्या अभिमानाला वाहिलेली प्रभावी आदरांजली आहे; जी आपल्या इतिहासाच्या पानांना नव्या तेजाने जिवंत करते आणि प्रत्येक पिढीच्या मनात अभिमानाची ज्योत प्रज्वलित करते.”

अभिनेत्री आणि निर्माती (मुंबई फिल्म कंपनी) जिनिलीया देशमुख यांनी चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी बोलताना सांगितले की, "आज मी अत्यंत भावूक झाले आहे. या संकल्पनेला निर्मितीपासून ते कला दिग्दर्शनापर्यंत प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी एकत्र येऊन हातभार लावला, त्या संपूर्ण टीमची आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीची मी मनापासून ऋणी आहे. प्रत्येकानेच अफाट सकारात्मकता, दृढ विश्वास आणि निस्सीम प्रेम सोबत आणले; आणि याच गोष्टींनी खऱ्या अर्थाने या चित्रपटाला आजचे हे सुंदर स्वरूप प्राप्त झाले आहे. केवळ एक चित्रपटच नव्हे, तर ‘राजा शिवाजी’ ही त्या महान विभूतीला, त्यांच्या जीवनकार्याला, त्यांच्या अमूल्य वारशाला आणि त्यांनी ज्या मूल्यांचे प्रतिनिधित्व केले, त्या सर्वांना आम्ही अर्पण केलेली एक मनापासूनची आदरांजली आहे. तसेच हा केवळ एक प्रकल्प नाही, तर ती एक मोठी जबाबदारी आहे आणि हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची संधी आम्हाला मिळाली, ही आमच्यासाठी खरोखरच परमकृपा आणि अभिमानाची बाब आहे."

एका साध्या आणि संघर्षमय सुरुवातीपासून ते एका अजिंक्य योद्धा-राजाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीवर केंद्रित आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात भव्य आणि पॅन-इंडिया स्तरावर उभा राहणाऱ्या प्रकल्पांपैकी एक म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जात असून, त्याची व्यापकता, नेत्रदीपक दृश्यरचना, थरारक ॲक्शन आणि उच्च दर्जाची तांत्रिक मांडणी यांमुळे तो आधीपासूनच चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. आता प्रदर्शित झालेला ‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच उंचावणार आहे.

या चित्रपटात हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार एकत्र आले आहेत. यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांचा समावेश आहे.

'जिओ स्टुडिओज प्रस्तुत' आणि 'मुंबई फिल्म कंपनी' निर्मित ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वाभिमान आणि प्रेरणादायी जीवनप्रवास भव्य आणि नेत्रदीपक पद्धतीने मोठ्या पडद्यावर साकारला जाणार असून, हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वाति अप्सरा राय तिच्या कठोर परिश्रम, प्रतिभा आणि समर्पणाच्या जोरावर मनोरंजन विश्वात स्वतःची ओळख निर्माण करत आहे

स्वाति अप्सरा राय ही एक प्रतिभावान मॉडेल, इन्फ्लुएन्सर आणि नृत्यांगना आहे, जी आता अभिनय विश्वात आपली ओळख निर्माण करण्यास सज्ज झाली आहे. सोशल मीडियावर तिची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे आणि इंस्टाग्रामवर तिचा एक मोठा आणि वेगाने वाढणारा चाहतावर्ग आहे. तिचे अनेक रील्स आणि व्हिडिओ व्हायरल झाले असून, त्यांना लाखो व्ह्यूज आणि प्रशंसा मिळाली आहे. मॉडेलिंग व्यतिरिक्त, स्वातिने अनेक प्रतिष्ठित ब्रँड्ससाठी ब्रायडल शूट्स, ज्वेलरी मोहिमा आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. तिचे मनमोहक व्यक्तिमत्व, आकर्षक रूप, उत्कृष्ट नृत्यकौशल्य, प्रभावी हावभाव आणि साधी शैली तिला गर्दीत वेगळे ठरवते. तिच्या फॅशन सेन्स आणि शैलीचे सोशल मीडियावर खूप कौतुक केले जाते आणि अनेकजण तिला फॅशन आयकॉन मानतात. लहानपणापासूनच, स्वाति तिच्या मनमोहक व्यक्तिमत्त्वामुळे आणि प्रभावी उपस्थितीमुळे जिथे कुठे जाते तिथे नेहमीच लक्ष वेधून घेते. तिला नेहमीच कलेची, विशेषतः नृत्याची आवड होती. तिच्याकडे नृत्याची नैसर्गिक प्रतिभा आहे आणि ती कोणतीही नृत्याची स्टेप किंवा हावभाव फक्त पाहून सहजपणे शिकू शकते. शालेय जीवनात, तिने सांस्कृतिक ...

मुनज़्जा सबुवाला ही करीना कपूर आणि कतरिना कैफ यांच्यापासून प्रेरित आहे

मॉडेल ते अभिनेत्री अशी वेगाने प्रगती करणारी मुनज़्जा सबुवाला लवकरच अनेक नवीन आणि मनोरंजक प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. ती लवकरच रिअॅलिटी शो, म्युझिक व्हिडिओ आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये तिच्या अभिनय कौशल्याचे प्रदर्शन करणार आहे. मुनज़्जाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेल म्हणून केली आणि तिच्या संपूर्ण प्रवासात नेहमीच स्वावलंबनाला प्राधान्य दिले. तिच्या सुरुवातीच्या काळात, तिने तिच्या गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याचे टाळण्याचे काम केले. तिच्या कमाईचा वापर करून, तिने तिचे फोटोशूट वापरले आणि स्वतःचा पोर्टफोलिओ तयार केला. या आत्मविश्वासाने आणि कठोर परिश्रमाने तिला पुढे नेले. यानंतर, मुनज़्जाने मॉडेलिंग असाइनमेंट, रॅम्प वॉक, प्रिंट शूट आणि जाहिरात मोहिमांमध्ये सतत काम केले. तिने मिस पुणे ही पदवी जिंकली आणि तिला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. तिने केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही अनेक प्रतिष्ठित मॉडेलिंग शोमध्ये भाग घेतला, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मॉडेलिंग उद्योगात मजबूत उपस्थिती निर्माण केल्यानंतर, ती आता एक अभिनेत्री म्हणून एका नवीन आणि श...

"मेरे कृष्ण" हे नाटक भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रमुख प्रकरणांचा उलगडा करेल

मुंबई। "मेरे कृष्ण" - भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य प्रवासाचे चित्रण करणारा एक भव्य रंगमंच - सादर केला जाईल. या नाटकात भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत सौरभ राज जैन, राधा आणि महामायाच्या भूमिकेत पूजा बी. शर्मा आणि दुर्योधन आणि कंसाच्या भूमिकेत अर्पित रांका आहेत. हे नाटक राजीव सिंह दिनकर यांनी दिग्दर्शित केले आहे आणि विवेक गुप्ता, राजीव सिंह दिनकर आणि विष्णू पाटील यांनी निर्मिती केली आहे. हे नाटक डॉ. नरेश कात्यायन यांनी लिहिले आहे आणि मूळ संगीत उद्धव ओझा यांनी दिले आहे. २ तास ४५ मिनिटांच्या धावण्याच्या वेळेसह, "मेरे कृष्ण" हा एक तल्लीन करणारा नाट्य अनुभव आहे जो तुम्हाला भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील दैवी, मानवी आणि तात्विक पैलूंमधून प्रवास करायला घेऊन जातो. हे नाटक भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रमुख प्रकरणांचे चित्रण करणाऱ्या २० जीवंत दृश्यांमधून उलगडते - वृंदावनातील बालपणापासून ते द्वारकेतील त्यांच्या शेवटच्या क्षणांपर्यंत. कालातीत तत्वज्ञानावर आधारित असले तरी, त्याची कथानक शैली मनोरंजक, दृश्यदृष्ट्या समृद्ध आणि भावनिकदृष्ट्या प्रभावी आहे - नाट्य, संगीत,...