सीधे मुख्य सामग्री पर जाएं

वर्षा राणे यांच्या ‘‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ ला सन्मान, दादा साहेब फिल्म फेस्टिवल 2026 मध्ये होणार स्क्रीनिंग

मुंबई। ऑल प्ले प्रोडक्शन्सची डेब्यू मराठी लघुपट ‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ ज्याचे लेखन व दिग्दर्शन वर्षा राणे यांनी केले आहे, 16 व्या दादासाहेब फ़िल्म फेस्टिवल 2026 मध्ये अधिकृत निवडीसह सन्मानित झाला आहे. या प्रतिष्ठित महोत्सवात चित्रपटाचे स्क्रीनिंगही होणार आहे, जे कोणत्याही नवोदित दिग्दर्शकासाठी महत्त्वाची कामगिरी मानली जाते।

हा महोत्सव दरवर्षी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडीराज गोविंद फाल्के Dhundiraj Govind Phalke यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जातो आणि नव्या, अर्थपूर्ण व प्रगतिशील सिनेमाला व्यासपीठ उपलब्ध करून देतो. अशा व्यासपीठावर निवड होणे म्हणजे चित्रपटाच्या विषयवस्तूची आणि मांडणीची गुणवत्ता अधोरेखित करणारे आहे।

‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ हा सामाजिक आशय असलेला चित्रपट असून अंधश्रद्धा आणि जागरूकता यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे मांडतो. कथानक एका छोट्या मुलीभोवती फिरते, जी आपल्या गावातील प्रचलित समजुतींना आव्हान देते. विशेष म्हणजे या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका स्वतः वर्षा राणे यांनी साकारली आहे, ज्यामुळे कथेला वैयक्तिक आणि वास्तवदर्शी स्पर्श मिळतो।

मर्यादित साधनसामग्री आणि कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाच्या सादरीकरणाची आणि विषयाची प्रशंसा होत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीत अथर्व युनिव्हर्सिटी आणि अथर्व स्कूल ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजनच्या विद्यार्थी, शिक्षक आणि टीमचा मोलाचा सहभाग आहे. या यशानंतर वर्षा राणे  आणि त्यांची टीम पुढील फीचर फिल्मच्या तयारीत गुंतली असून त्यांच्या सर्जनशील प्रवासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे।

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्रामचे उद्घाटन

मुंबई। टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने शरयू टोयोटा यांच्या भागीदारीत सीएसएमएसएस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्राम (टी-टीईपी) चे उद्घाटन केले. या उपक्रमाद्वारे भारताच्या ‘स्किल इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ या ध्येयांना पाठबळ देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. नवीन स्थापन केलेले प्रशिक्षण केंद्र सीएसएमएसएस संस्थेचे अध्यक्ष श्री. रंजीत पी. मुलाय, सचिव श्री. पद्माकर एच. मुलाय, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत जी. देशमुख, सीएसएमएसएस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. शशिकांत आर. डिकले, सीएसएमएसएस छ. शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. गणेश बी. डोंगरे, शरयू टोयोटाचे संचालक श्री. नसीर मानेर तसेच टोयोटा किर्लोस्कर मोटरचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. हे केंद्र तांत्रिक शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि उद्योगातील अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आले आहे, विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल समुदायातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. टी-टीईपी अभ्यासक...

कॉईनडीसीएक्सने ‘सतर्क रहे’ सायबर सुरक्षा जनजागृती मोहिम सुरू केली

मुंबई। भारतातील सर्वात मोठी क्रिप्टो एक्स्चेंज कंपनी कॉईनडीसीएक्सने ‘सतर्क रहे’ या सोशल फर्स्ट सायबर सुरक्षा जनजागृती मोहिमेची घोषणा केली. ही मोहिम भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (१४सी) आणि गृहमंत्रालय (एमएचए) यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ ‘सायबर जागरूकता दिवस’ या राष्ट्रीय मोहिमेशी जोडलेला आहे, जो १४सी आणि गृहमंत्रालयाच्या पुढाकाराने दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी साजरा केला जातो. ‘सतर्क रहे’ ही मोहिम कॉईनडीसीएक्सच्या १०० कोटी रुपयांचा उपक्रम डिजिटल सुरक्षा नेटवर्क (डीएसएन)चा विस्तार आहे, ज्याचा उद्देश नागरिकांना डिजिटल आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षित ठेवणे आणि देशभरात सायबर सुरक्षा जनजागृती मजबूत करणे आहे. ‘सतर्क रहे’ मोहिमेचे उद्दिष्ट म्हणजे लोकांना सामान्य डिजिटल फसवणुकीची ओळख करून देणे आणि त्यावर योग्य प्रतिसाद देण्यासाठी मदत करणे. ‘सतर्क’ या व्यक्तिरेखेभोवती ही संकल्पना उभी करण्यात आली असून, सोशल मीडिया वरील दैनंदिन प्रसंग आणि संवादात्मक स्वरूप वापरून फसवणूक शिक्षण अधिक सोपे, संबंधित आणि भावनिकदृष्ट्या प्रभावी करण्याचा प्रयत्न केल...

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘हंगर फ्री वर्ल्ड’ उपक्रमाचे उद्घाटन

मलाबार ग्रुप केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज मोफत पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणार मुंबई। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईतील कांदिवली पूर्व येथील अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र (ABVKVK) येथे मलाबार ग्रुपच्या ‘हंगर फ्री वर्ल्ड’ उपक्रमाचे उद्घाटन केले. हा उपक्रम युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि भविष्यातील रोजगार संधींना बळकटी देण्यासाठी पोषणाच्या महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करतो. या उपक्रमाअंतर्गत, मलाबार ग्रुप केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज १०० पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणार आहे. यामुळे त्यांच्या आरोग्य आणि कल्याणाला आधार मिळेल तसेच ते व्यावसायिक प्रशिक्षण, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, करिअर विकास आणि भविष्यातील रोजगार संधींवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतील. हा उपक्रम मलाबार ग्रुपच्या हंगर फ्री वर्ल्ड कार्यक्रमाचा एक भाग आहे, जो समूहाच्या प्रमुख कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांपैकी एक असून, भूक निर्मूलन आणि वंचित समुदायांना पोषणाची उपलब्धता वाढविण्यावर केंद्रित आहे. हंगर फ्री वर्ल्...