सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सोमानी सिरॅमिक्स’कडून नवीन ब्रँड ओळखीचे अनावरण

मुंबई। जगातील १२ वी सर्वांत मोठी टाइल्स उत्पादक आणि भारतातील टाइल्स, बाथवेअर; तसेच होम अँड बिल्डिंग सोल्युशन्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘सोमानी सिरॅमिक्स लिमिटेड’ने आपल्या नवीन ब्रँड ओळखीचे अनावरण केले आहे. घराच्या आणि इमारतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या सर्व गरजा एकाच छताखाली पूर्ण करणारे केंद्र म्हणून स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

ही नवीन ओळख ‘सोमानी’चा गेल्या पाच दशकांतील प्रवास अधोरेखित करते. केवळ टाइल्स उत्पादक ते आधुनिक जीवनशैलीला आकार देणारा ब्रँड असा हा वेगवान बदल आहे. कंपनीचा विस्तारत असलेला पोर्टफोलिओ लक्षात घेऊन हा नवीन लोगो तयार करण्यात आला आहे. ‘हा नवीन ब्रँड आमच्या ५५ वर्षांच्या प्रवासातील एक निर्णायक क्षण आहे. हे आमची नावीन्यपूर्ण वृत्ती, शाश्वतता आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. आम्ही आजवर कमावलेला विश्वास, ताकद आणि व्याप्ती या नवीन ओळखीमध्ये सामावलेली आहे. याशिवाय पुढच्या पिढीचे नेतृत्व कंपनीला पुढे नेण्यासाठी सज्ज होत असताना, ही नवी ओळख आमची भविष्यातील दिशा अधिक स्पष्ट करते,’ अशी माहिती ‘सोमानी सिरॅमिक्स’चे एमडी आणि सीईओ अभिषेक सोमानी यांनी दिली.

नवीन लोगोमध्ये आधुनिक जागेतील प्रवाहीपणा दर्शवण्यासाठी मृदू आणि वळणदार रेषांचा (कर्व्ह) वापर करण्यात आला आहे. हा लोगो आता अधिक लवचीक आणि वास्तुशिल्पीय स्वरूपात सादर झाला आहे. लोगोमधील गडद लाल रंग ऊर्जा आणि व्याप्ती दर्शवतो. निळ्या रंगाचा बाण प्रगतीची दिशा आणि वेग दर्शवतो. ही रंगसंगती आत्मविश्वासपूर्ण आणि आधुनिक आहे. नवीन ब्रँड ओळखीनुसार ‘सोमानी’ या शब्दातील प्रत्येक अक्षराला विशेष अर्थ देण्यात आला आहे. स्केल, ओरिजिनॅलिटी, मोमेंटम, अशुरन्स, न्यू हॉरीझॉन्स आणि यंग.

ही नवीन ब्रँड ओळख आता रिटेल स्टोअर, पॅकेजिंग, जाहिराती आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्वत्र कार्यान्वित केली जाईल. त्यामुळे ग्राहकांसह वास्तुविशारद आणि डिझायनर्सना दर्जेदार अनुभव मिळेल.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

अक्षयकल्प ऑर्गेनिकचा मुंबई आणि पुण्यात प्रवेश

दक्षिण भारतात सुरू झालेला भारताचा आघाडीचा प्रमाणित ऑर्गेनिक डेअरी ब्रँडचा प्रवास आता महाराष्ट्रासह राष्ट्रीय स्तरावर विस्तारत आहे  मुंबई। भारतातील आघाडीचा प्रमाणित ऑर्गेनिक डेअरी ब्रँड (सेंद्रिय दुग्धजन्य उत्पादन ब्रँड) अक्षयकल्प ऑर्गेनिकने आज मुंबई आणि पुणे बाजारपेठेत अधिकृत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. दक्षिण भारतातील लोकप्रिय ब्रँडपासून संपूर्ण भारतातील घराघरात पोहोचण्याच्या त्यांच्या प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 2010 मध्ये स्थापन झालेल्या आणि स्वच्छ पोषण व शेतकरी सक्षमीकरण या दोन तत्त्वांवर उभारलेल्या अक्षयकल्प ऑर्गेनिककडून महाराष्ट्रात त्यांच्या प्रमाणित सेंद्रिय दुग्धजन्य उत्पादनांचा संपूर्ण संच उपलब्ध करून दिला जात आहे. यामध्ये दूध, तूप, दही, लोणी, पनीर, चीज, ताक तसेच त्यांची वेगाने वाढणारी उच्च-प्रथिनांची श्रेणी यांचा समावेश आहे. ही सर्व उत्पादने अँटिबायोटिक्स, कृत्रिम हार्मोन्स, कीटकनाशकांचा उरलेला साका किंवा गाळ, अन्न खराब होऊ नये, जास्त काळ टिकावे आणि त्याची गुणवत्ता कायम राहावी यासाठी वापरली जाणारी संरक्षक द्रव्ये आणि कृत्रिम अॅडिटिव्ह्सपासून ...

होमलेनकडून सीबीडी बेलापूर नवी मुंबईमध्ये नवीन स्टुडिओचे उद्घाटन

नवी मुंबई। होमलेन या भारतातील आघाडीच्‍या तंत्रज्ञान व एआय-आधारित होम इंटीरियर ब्रँडने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे आपला पहिला स्टुडिओ लाँच केला आहे. प्रबळ पायाभूत सुविधा आणि मुंबई महानगर क्षेत्राशी असलेल्या उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे बेलापूर हे महत्त्वाचे व्यापारी आणि निवासी केंद्र म्हणून ओळखले जाते. या लाँचसह, होमलेनने वेगाने वाढणाऱ्या शहरी बाजारपेठांमध्ये आपला विस्तार सुरूच ठेवला आहे, तसेच तंत्रज्ञानावर आधारित एंड-टू-एंड होम इंटीरियर सोल्यूशन्स आता घरमालकांच्या अधिक जवळ आणले आहेत. हा स्टुडिओ संतोष कुमार जे आणि पार्थिबन सुधमन यांच्या भागीदारीत सुरू करण्यात आला आहे. त्यांची स्थानिक बाजारपेठेतील सखोल समज आणि होमलेनचा तंत्रज्ञान-आधारित दृष्टिकोन यामुळे नवी मुंबईतील घरमालकांना अधिक पारदर्शक, त्रासमुक्त व विनाव्यत्यय इंटीरियरचा अनुभव मिळण्यास मदत होईल. होमलेनचे सह-संस्थापक आणि सीओओ तनुज चौधरी म्हणाले, “नवी मुंबई आमच्यासाठी नेहमी महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे, विशेषतः सीबीडी बेलापूरसारखी ठिकाणे, जिथे प्रबळ पायाभूत सुविधांमुळे निवासी क्षेत्रात शाश्वत वाढ होत आहे. या...

'बोलो राधे राधे' मध्ये प्रसिद्ध गायकांचा सहभाग, चित्रपटाची आध्यात्मिक खोली अधिक दृढ करत आहे

लखनऊ/मथुरा। आगामी धार्मिक हिंदी चित्रपट "बोलो राधे राधे" प्रचंड चर्चेत असून, त्यामुळे त्याच्या भक्तीपूर्ण भावना अधिकच दृढ होत आहेत. आता या चित्रपटाशी एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक संबंध जोडला गेला आहे, कारण पूजनीय संत आणि भक्तीगायक श्री गुरु स्वामी रसराज कृष्णदास यांनी आपल्या सुमधुर आवाजाने चित्रपटाच्या संगीताला समृद्ध केले आहे. भक्ती परंपरेत खोलवर रुजलेल्या स्वामी रसराज कृष्णदास यांचे हे योगदान केवळ एक संगीत सहयोग म्हणून नव्हे, तर एक आध्यात्मिक समर्पण म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाच्या मूळ संदेशाला—भक्ती, सेवा आणि शाश्वत मूल्ये—अधिक सत्यता प्राप्त होते. चित्रपटाचे संगीत मन्न मिश्रा यांनी दिले आहे, जे पारंपरिक भक्ती संगीताची खोली आणि चित्रपटीय अभिव्यक्ती यांचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न करतात. गीते लेखक-दिग्दर्शक रवी भाटिया यांनी लिहिली आहेत. या दुहेरी जबाबदारीमुळे संगीत चित्रपटाच्या कथेला आणि भावनिक प्रवाहाला खोलवर जोडले जाते. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या सहयोगाला एक आशीर्वाद संबोधून कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांचा विश्वास आहे ...