सीधे मुख्य सामग्री पर जाएं

भारत-न्यूझीलंडमध्ये 'मुक्त व्यापार' कराराने भारतासाठी प्रगतीची नवी दारे उघडली : एस. जयशंकर

मुंबई। भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये आज एक सुवर्ण अध्याय जोडला गेला आहे. दोन्ही देशांनी ऐतिहासिक 'मुक्त व्यापार करारावर' (एफटीए) स्वाक्षरी केली असून, यामुळे भारताच्या निर्यातीला मोठा वेग मिळणार आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या कराराचे वर्णन 'ऐतिहासिक मैलाचा दगड' असे केले असून, यामुळे दोन्ही देशांमधील धोरणात्मक विश्वास आणि आर्थिक सहकार्य अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर २७ एप्रिल रोजी हा करार अंतिम करण्यात आला. केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे वाणिज्यमंत्री टॉड मॅक्ले यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमी वेळेत हा करार पूर्ण झाल्याचेही जयशंकर यांनी नमूद केले.
करारानुसार, भारतातून न्यूझीलंडला जाणाऱ्या १०० टक्के निर्यातीवर शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडकडून भारतात येणाऱ्या सुमारे ९५ टक्के वस्तूंवरील शुल्क टप्प्याटप्प्याने कमी किंवा रद्द करण्यात येणार आहे. यामुळे वस्त्रोद्योग, औषधनिर्मिती, अभियांत्रिकी यांसारख्या क्षेत्रांना मोठी चालना मिळणार आहे.
जयशंकर यांनी ‘एक्स’ या सामाजिक माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये करारामुळे गुंतवणूक वाढ, निर्यात वाढ आणि बाजारपेठांमध्ये अधिक प्रवेश मिळणार असल्याचे सांगितले. नवोन्मेषक, उद्योजक, शेतकरी, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, महिला आणि युवकांसाठी नव्या संधी खुल्या होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
करारातील महत्त्वाच्या तरतुदीनुसार, पुढील १५ वर्षांत न्यूझीलंडकडून भारतात सुमारे २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार आहे. तसेच, दरवर्षी ५,००० कुशल व्यावसायिकांसाठी व्हिसा उपलब्ध होणार असून माहिती तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रात मनुष्यबळाची देवाणघेवाण सुलभ होईल. सध्या न्यूझीलंडमध्ये सुमारे ८,००० भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; त्यांच्या शिक्षणोत्तर कामाच्या संधीही या करारामुळे अधिक सुलभ होणार आहेत.
दोन्ही देशांनी पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार ५ अब्ज डॉलर्सपर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आर्थिक संबंधांना नवी गती देत हा करार भारत–न्यूझीलंड भागीदारीला अधिक व्यापक आणि दीर्घकालीन दिशा देणारा ठरणार आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्रामचे उद्घाटन

मुंबई। टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने शरयू टोयोटा यांच्या भागीदारीत सीएसएमएसएस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्राम (टी-टीईपी) चे उद्घाटन केले. या उपक्रमाद्वारे भारताच्या ‘स्किल इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ या ध्येयांना पाठबळ देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. नवीन स्थापन केलेले प्रशिक्षण केंद्र सीएसएमएसएस संस्थेचे अध्यक्ष श्री. रंजीत पी. मुलाय, सचिव श्री. पद्माकर एच. मुलाय, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत जी. देशमुख, सीएसएमएसएस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. शशिकांत आर. डिकले, सीएसएमएसएस छ. शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. गणेश बी. डोंगरे, शरयू टोयोटाचे संचालक श्री. नसीर मानेर तसेच टोयोटा किर्लोस्कर मोटरचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. हे केंद्र तांत्रिक शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि उद्योगातील अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आले आहे, विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल समुदायातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. टी-टीईपी अभ्यासक...

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘हंगर फ्री वर्ल्ड’ उपक्रमाचे उद्घाटन

मलाबार ग्रुप केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज मोफत पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणार मुंबई। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईतील कांदिवली पूर्व येथील अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र (ABVKVK) येथे मलाबार ग्रुपच्या ‘हंगर फ्री वर्ल्ड’ उपक्रमाचे उद्घाटन केले. हा उपक्रम युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि भविष्यातील रोजगार संधींना बळकटी देण्यासाठी पोषणाच्या महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करतो. या उपक्रमाअंतर्गत, मलाबार ग्रुप केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज १०० पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणार आहे. यामुळे त्यांच्या आरोग्य आणि कल्याणाला आधार मिळेल तसेच ते व्यावसायिक प्रशिक्षण, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, करिअर विकास आणि भविष्यातील रोजगार संधींवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतील. हा उपक्रम मलाबार ग्रुपच्या हंगर फ्री वर्ल्ड कार्यक्रमाचा एक भाग आहे, जो समूहाच्या प्रमुख कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांपैकी एक असून, भूक निर्मूलन आणि वंचित समुदायांना पोषणाची उपलब्धता वाढविण्यावर केंद्रित आहे. हंगर फ्री वर्ल्...

फुजीफिल्म इंडिया ने भारतातील एनएम वैद्यकीय मध्ये एआय -पावर्ड डिजिटल मॅमोग्राफी सिस्टम प्रथम बार स्थापित करण्याची घोषणा केली

मुंबई: प्रगत निदान इमेजिंग सोल्यूशन्स क्षेत्रातील अग्रणी असलेल्या फुजीफिल्म इंडियाने एनएम मेडिकलमध्ये आपली नवीनतम एआय-सक्षम डिजिटल मॅमोग्राफी प्रणाली, 'अम्युलेट सोफिनिटी' स्थापित केल्याची घोषणा केली. एनएम मेडिकल येथे आयोजित एका स्थापना कार्यक्रमादरम्यान ही घोषणा करण्यात आली. एनएम मेडिकल ही एक अग्रगण्य निदान आरोग्यसेवा प्रदाता असून, तिची २२ हून अधिक केंद्रे आणि ३० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या १,००० हून अधिक व्यावसायिकांची बहु-शाखीय टीम आहे. हे पाऊल प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि प्रगत इमेजिंग नवकल्पनांच्या माध्यमातून स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यास पाठिंबा देण्याच्या भारताच्या निरंतर वचनबद्धतेचे प्रतीक आहे. भारताच्या आरोग्यसेवा परिसंस्थेमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि लवकर निदान यावर, विशेषतः महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत, वाढता भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रामच्या अंदाजानुसार, भारतात महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोग राहील, आणि २०२५ प...