सीधे मुख्य सामग्री पर जाएं

किया इंडियाने ५०० वर्कशॉप्सचा टप्पा ओलांडला

मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने अहमदाबादमधील चांदखेडा येथे आपल्या ५००व्या सर्व्हिस वर्कशॉपच्‍या उद्घाटनाची घोषणा केली. या टप्‍प्‍यामधून कंपनीची ग्राहकांना प्राधान्‍य देण्‍याप्रती अतूट कटिबद्धता दिसून येते. तसेच, हे पाऊल देशभरातील १.५ दशलक्षहून अधिक ग्राहकांच्या वाढत्या संख्येसाठी मजबूत आणि भविष्यवेधी विक्रीपश्चात्त परिसंस्‍थेला प्रबळ करते.

५००व्‍या वर्कशॉपचा हा टप्पा नेटवर्कचा विस्‍तार दाखवण्‍यासोबत विनासायास, पारदर्शक आणि सोयीस्कर मालकीचा अनुभव देण्यावर किया इंडियाचा असलेला सातत्यपूर्ण भर अधोरेखित करतो. 'मूव्‍हमेंट दॅट इन्‍स्‍पायर्स' या मूळ तत्त्वावर आधारित कंपनी आपल्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि सेवा क्षमतांमध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहे, ज्‍यामुळे ग्राहकांशी होणारा प्रत्येक संवाद विश्वास, कार्यक्षमता आणि सुलभतेने परिपूर्ण असेल.

अहमदाबादमधील चांदखेडा येथे नुकतेच उद्घाटन झालेले वेस्ट कोस्ट वर्कशॉप हे कियाचे भारतातील सर्वात मोठे वर्कशॉप आहे, ज्‍यामधून कंपनीची विस्तार आणि सेवा उत्कृष्टतेप्रती असलेली कटिबद्धता दिसून येते. ७६,०६९ चौरस फूट (ज्यापैकी ४१,६४० चौरस फूट क्षेत्र आच्छादित आहे) जागेवर पसरलेले हे अत्याधुनिक वर्कशॉप उच्‍च कार्यक्षमता आणि जलद सेवेसाठी डिझाइन करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये ५७ सर्व्हिस बे उपलब्ध आहेत, ज्यामध्ये धुणे आणि साफसफाईसाठीच्या ८ स्वतंत्र विभागांचा समावेश आहे. तसेच, वाहनांच्या सुलभ हालचालीसाठी १०० पार्किंग बे तयार करण्यात आले आहेत. ९० प्रशिक्षित व्यावसायिकांच्या टीमसह हे केंद्र वार्षिक ४०,००० वाहनांची सर्व्हिसिंग करण्याची क्षमता ठेवते, ज्यामुळे या क्षेत्रातील ग्राहकांसाठी सेवा अधिक सुलभ होणार आहे.

वेस्ट कोस्ट किया हा देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवणारा, तसेच अहमदाबाद, गांधीनगर व हिंमतनगरमध्ये प्रबळ उपस्थिती असलेला कियाचा भारतातील तिसरा सर्वात मोठा डीलर समूह आहे.

या महत्त्वाच्या टप्प्याबाबत मत व्‍यक्त करत किया इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्‍टर आणि सीईओ ग्वांगु ली म्हणाले, "आमच्या ५०० व्या सर्व्हिस वर्कशॉपचे उद्घाटन हा अभिमानास्पद टप्पा आहे, ज्‍यामधून आमचा ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन दिसून येतो. ही उपलब्धी फक्त नेटवर्कच्या विस्तारापुरती मर्यादित नाही, तर प्रत्येक किया ग्राहकाला त्यांच्या कार मालकीच्या प्रवासात सोयीस्कर सेवा, पारदर्शकता आणि विश्वासाचा अनुभव मिळेल याची खात्री देणारी आहे. आम्ही आमच्या नेटवर्कचा विस्तार करत असताना आमचे भविष्यासाठी सज्ज, शाश्वत आणि डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित विक्रीपश्चात्त परिसंस्‍था प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित आहे."

किया इंडियाने आता ३९१ शहरांमध्ये ८०० सेवा केंद्रांपर्यंत (मोबाईल टचपॉईंट्ससह) आपली उपस्थिती वाढवली आहे, हे देशातील सर्वात व्यापक विक्रीपश्चात्त नेटवर्क बनले आहे. ५००व्या वर्कशॉपच्या या टप्प्यामुळे कियाची उपस्थिती विशेषतः अशा बाजारपेठांमध्ये अधिक मजबूत झाली आहे, जिथे आधी ब्रँडचे प्रतिनिधीत्व नव्हते, ज्यामुळे हा ब्रँड ग्राहकांच्या अधिक जवळ पोहोचला आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

होमलेनकडून सीबीडी बेलापूर नवी मुंबईमध्ये नवीन स्टुडिओचे उद्घाटन

नवी मुंबई। होमलेन या भारतातील आघाडीच्‍या तंत्रज्ञान व एआय-आधारित होम इंटीरियर ब्रँडने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे आपला पहिला स्टुडिओ लाँच केला आहे. प्रबळ पायाभूत सुविधा आणि मुंबई महानगर क्षेत्राशी असलेल्या उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे बेलापूर हे महत्त्वाचे व्यापारी आणि निवासी केंद्र म्हणून ओळखले जाते. या लाँचसह, होमलेनने वेगाने वाढणाऱ्या शहरी बाजारपेठांमध्ये आपला विस्तार सुरूच ठेवला आहे, तसेच तंत्रज्ञानावर आधारित एंड-टू-एंड होम इंटीरियर सोल्यूशन्स आता घरमालकांच्या अधिक जवळ आणले आहेत. हा स्टुडिओ संतोष कुमार जे आणि पार्थिबन सुधमन यांच्या भागीदारीत सुरू करण्यात आला आहे. त्यांची स्थानिक बाजारपेठेतील सखोल समज आणि होमलेनचा तंत्रज्ञान-आधारित दृष्टिकोन यामुळे नवी मुंबईतील घरमालकांना अधिक पारदर्शक, त्रासमुक्त व विनाव्यत्यय इंटीरियरचा अनुभव मिळण्यास मदत होईल. होमलेनचे सह-संस्थापक आणि सीओओ तनुज चौधरी म्हणाले, “नवी मुंबई आमच्यासाठी नेहमी महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे, विशेषतः सीबीडी बेलापूरसारखी ठिकाणे, जिथे प्रबळ पायाभूत सुविधांमुळे निवासी क्षेत्रात शाश्वत वाढ होत आहे. या...

'बोलो राधे राधे' मध्ये प्रसिद्ध गायकांचा सहभाग, चित्रपटाची आध्यात्मिक खोली अधिक दृढ करत आहे

लखनऊ/मथुरा। आगामी धार्मिक हिंदी चित्रपट "बोलो राधे राधे" प्रचंड चर्चेत असून, त्यामुळे त्याच्या भक्तीपूर्ण भावना अधिकच दृढ होत आहेत. आता या चित्रपटाशी एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक संबंध जोडला गेला आहे, कारण पूजनीय संत आणि भक्तीगायक श्री गुरु स्वामी रसराज कृष्णदास यांनी आपल्या सुमधुर आवाजाने चित्रपटाच्या संगीताला समृद्ध केले आहे. भक्ती परंपरेत खोलवर रुजलेल्या स्वामी रसराज कृष्णदास यांचे हे योगदान केवळ एक संगीत सहयोग म्हणून नव्हे, तर एक आध्यात्मिक समर्पण म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाच्या मूळ संदेशाला—भक्ती, सेवा आणि शाश्वत मूल्ये—अधिक सत्यता प्राप्त होते. चित्रपटाचे संगीत मन्न मिश्रा यांनी दिले आहे, जे पारंपरिक भक्ती संगीताची खोली आणि चित्रपटीय अभिव्यक्ती यांचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न करतात. गीते लेखक-दिग्दर्शक रवी भाटिया यांनी लिहिली आहेत. या दुहेरी जबाबदारीमुळे संगीत चित्रपटाच्या कथेला आणि भावनिक प्रवाहाला खोलवर जोडले जाते. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या सहयोगाला एक आशीर्वाद संबोधून कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांचा विश्वास आहे ...

‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरला अक्षय कुमार, करण जोहर, नागराज मंजुळे, आदित्य सरपोतदार आणि इतर अनेक दिग्गजांची पसंती

मुंबई। 'जिओ स्टुडिओज' आणि 'मुंबई फिल्म कंपनी' निर्मित ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलरला २० एप्रिल रोजी प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक अशा अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणाऱ्या रितेश विलासराव देशमुख यांनी साकारलेला हा चित्रपट भारताचे महान योद्धे आणि ‘हिंदवी स्वराज्य'चे  संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आणि वारशावर आधारित आहे. ॲक्शन, भावना आणि भव्य दृश्यांनी सजलेल्या ‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरने प्रदर्शित होताच सर्वत्र चर्चांना उधाण आणले आहे. या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगवली असून, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनीही या अनोख्या सिनेमॅटिक अनुभवाचे भरभरून कौतुक केले आहे. अभिनेता अक्षय कुमार, निर्माता करण जोहर, दिग्दर्शक नागराज मंजुळे ते आदित्य सरपोतदार यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी ट्रेलरबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत चित्रपटाच्या भव्यतेचे आणि आशयाचे कौतुक केले आहे. ‘राजा शिवाजी’...