सीधे मुख्य सामग्री पर जाएं

किया इंडियाने ५०० वर्कशॉप्सचा टप्पा ओलांडला

मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने अहमदाबादमधील चांदखेडा येथे आपल्या ५००व्या सर्व्हिस वर्कशॉपच्‍या उद्घाटनाची घोषणा केली. या टप्‍प्‍यामधून कंपनीची ग्राहकांना प्राधान्‍य देण्‍याप्रती अतूट कटिबद्धता दिसून येते. तसेच, हे पाऊल देशभरातील १.५ दशलक्षहून अधिक ग्राहकांच्या वाढत्या संख्येसाठी मजबूत आणि भविष्यवेधी विक्रीपश्चात्त परिसंस्‍थेला प्रबळ करते.

५००व्‍या वर्कशॉपचा हा टप्पा नेटवर्कचा विस्‍तार दाखवण्‍यासोबत विनासायास, पारदर्शक आणि सोयीस्कर मालकीचा अनुभव देण्यावर किया इंडियाचा असलेला सातत्यपूर्ण भर अधोरेखित करतो. 'मूव्‍हमेंट दॅट इन्‍स्‍पायर्स' या मूळ तत्त्वावर आधारित कंपनी आपल्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि सेवा क्षमतांमध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहे, ज्‍यामुळे ग्राहकांशी होणारा प्रत्येक संवाद विश्वास, कार्यक्षमता आणि सुलभतेने परिपूर्ण असेल.

अहमदाबादमधील चांदखेडा येथे नुकतेच उद्घाटन झालेले वेस्ट कोस्ट वर्कशॉप हे कियाचे भारतातील सर्वात मोठे वर्कशॉप आहे, ज्‍यामधून कंपनीची विस्तार आणि सेवा उत्कृष्टतेप्रती असलेली कटिबद्धता दिसून येते. ७६,०६९ चौरस फूट (ज्यापैकी ४१,६४० चौरस फूट क्षेत्र आच्छादित आहे) जागेवर पसरलेले हे अत्याधुनिक वर्कशॉप उच्‍च कार्यक्षमता आणि जलद सेवेसाठी डिझाइन करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये ५७ सर्व्हिस बे उपलब्ध आहेत, ज्यामध्ये धुणे आणि साफसफाईसाठीच्या ८ स्वतंत्र विभागांचा समावेश आहे. तसेच, वाहनांच्या सुलभ हालचालीसाठी १०० पार्किंग बे तयार करण्यात आले आहेत. ९० प्रशिक्षित व्यावसायिकांच्या टीमसह हे केंद्र वार्षिक ४०,००० वाहनांची सर्व्हिसिंग करण्याची क्षमता ठेवते, ज्यामुळे या क्षेत्रातील ग्राहकांसाठी सेवा अधिक सुलभ होणार आहे.

वेस्ट कोस्ट किया हा देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवणारा, तसेच अहमदाबाद, गांधीनगर व हिंमतनगरमध्ये प्रबळ उपस्थिती असलेला कियाचा भारतातील तिसरा सर्वात मोठा डीलर समूह आहे.

या महत्त्वाच्या टप्प्याबाबत मत व्‍यक्त करत किया इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्‍टर आणि सीईओ ग्वांगु ली म्हणाले, "आमच्या ५०० व्या सर्व्हिस वर्कशॉपचे उद्घाटन हा अभिमानास्पद टप्पा आहे, ज्‍यामधून आमचा ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन दिसून येतो. ही उपलब्धी फक्त नेटवर्कच्या विस्तारापुरती मर्यादित नाही, तर प्रत्येक किया ग्राहकाला त्यांच्या कार मालकीच्या प्रवासात सोयीस्कर सेवा, पारदर्शकता आणि विश्वासाचा अनुभव मिळेल याची खात्री देणारी आहे. आम्ही आमच्या नेटवर्कचा विस्तार करत असताना आमचे भविष्यासाठी सज्ज, शाश्वत आणि डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित विक्रीपश्चात्त परिसंस्‍था प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित आहे."

किया इंडियाने आता ३९१ शहरांमध्ये ८०० सेवा केंद्रांपर्यंत (मोबाईल टचपॉईंट्ससह) आपली उपस्थिती वाढवली आहे, हे देशातील सर्वात व्यापक विक्रीपश्चात्त नेटवर्क बनले आहे. ५००व्या वर्कशॉपच्या या टप्प्यामुळे कियाची उपस्थिती विशेषतः अशा बाजारपेठांमध्ये अधिक मजबूत झाली आहे, जिथे आधी ब्रँडचे प्रतिनिधीत्व नव्हते, ज्यामुळे हा ब्रँड ग्राहकांच्या अधिक जवळ पोहोचला आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्रामचे उद्घाटन

मुंबई। टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने शरयू टोयोटा यांच्या भागीदारीत सीएसएमएसएस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्राम (टी-टीईपी) चे उद्घाटन केले. या उपक्रमाद्वारे भारताच्या ‘स्किल इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ या ध्येयांना पाठबळ देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. नवीन स्थापन केलेले प्रशिक्षण केंद्र सीएसएमएसएस संस्थेचे अध्यक्ष श्री. रंजीत पी. मुलाय, सचिव श्री. पद्माकर एच. मुलाय, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत जी. देशमुख, सीएसएमएसएस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. शशिकांत आर. डिकले, सीएसएमएसएस छ. शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. गणेश बी. डोंगरे, शरयू टोयोटाचे संचालक श्री. नसीर मानेर तसेच टोयोटा किर्लोस्कर मोटरचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. हे केंद्र तांत्रिक शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि उद्योगातील अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आले आहे, विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल समुदायातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. टी-टीईपी अभ्यासक...

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘हंगर फ्री वर्ल्ड’ उपक्रमाचे उद्घाटन

मलाबार ग्रुप केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज मोफत पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणार मुंबई। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईतील कांदिवली पूर्व येथील अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र (ABVKVK) येथे मलाबार ग्रुपच्या ‘हंगर फ्री वर्ल्ड’ उपक्रमाचे उद्घाटन केले. हा उपक्रम युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि भविष्यातील रोजगार संधींना बळकटी देण्यासाठी पोषणाच्या महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करतो. या उपक्रमाअंतर्गत, मलाबार ग्रुप केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज १०० पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणार आहे. यामुळे त्यांच्या आरोग्य आणि कल्याणाला आधार मिळेल तसेच ते व्यावसायिक प्रशिक्षण, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, करिअर विकास आणि भविष्यातील रोजगार संधींवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतील. हा उपक्रम मलाबार ग्रुपच्या हंगर फ्री वर्ल्ड कार्यक्रमाचा एक भाग आहे, जो समूहाच्या प्रमुख कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांपैकी एक असून, भूक निर्मूलन आणि वंचित समुदायांना पोषणाची उपलब्धता वाढविण्यावर केंद्रित आहे. हंगर फ्री वर्ल्...

फुजीफिल्म इंडिया ने भारतातील एनएम वैद्यकीय मध्ये एआय -पावर्ड डिजिटल मॅमोग्राफी सिस्टम प्रथम बार स्थापित करण्याची घोषणा केली

मुंबई: प्रगत निदान इमेजिंग सोल्यूशन्स क्षेत्रातील अग्रणी असलेल्या फुजीफिल्म इंडियाने एनएम मेडिकलमध्ये आपली नवीनतम एआय-सक्षम डिजिटल मॅमोग्राफी प्रणाली, 'अम्युलेट सोफिनिटी' स्थापित केल्याची घोषणा केली. एनएम मेडिकल येथे आयोजित एका स्थापना कार्यक्रमादरम्यान ही घोषणा करण्यात आली. एनएम मेडिकल ही एक अग्रगण्य निदान आरोग्यसेवा प्रदाता असून, तिची २२ हून अधिक केंद्रे आणि ३० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या १,००० हून अधिक व्यावसायिकांची बहु-शाखीय टीम आहे. हे पाऊल प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि प्रगत इमेजिंग नवकल्पनांच्या माध्यमातून स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यास पाठिंबा देण्याच्या भारताच्या निरंतर वचनबद्धतेचे प्रतीक आहे. भारताच्या आरोग्यसेवा परिसंस्थेमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि लवकर निदान यावर, विशेषतः महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत, वाढता भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रामच्या अंदाजानुसार, भारतात महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोग राहील, आणि २०२५ प...