सीधे मुख्य सामग्री पर जाएं

भारतीय फार्मा क्षेत्रात रे निओ फार्माचे पदार्पण

९०+ फॉर्म्युलेशन्ससह फार्मा क्षेत्रात दमदार एंट्री 

मुंबई। रे निओ फार्मा या नेक्‍स्‍ट-जनेरशन फार्मास्‍युटिकल कंपनीने भारतातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अधिकृतपणे आपल्या कार्याचा शुभारंभ केला आहे. स्थिर व विस्तारक्षम कार्यप्रणालीवर आधारित आणि पाच दशकांहून अधिक काळ विविध क्षेत्रांतील यशस्वी उद्योजकतेचा वारसा लाभलेली रे निओ फार्मा अॅक्युट आणि स्पेशलाइज्ड थेरपी विभागांमध्ये ९० पेक्षा जास्त औषध प्रकार सादर करणार आहे. तसेच, अनेक नाविन्यपूर्ण औषधे सध्या संशोधनाच्या टप्प्यात आहेत.

प्रसिद्ध उद्योजक अमित पटनी यांनी रे निओ फार्माची स्थापना केली आहे. पटनी कॉम्प्युटर्सच्या निर्मितीमागे असलेला समृद्ध कौटुंबिक वारसा आणि उत्पादन, आरोग्य पायाभूत सुविधा, ऊर्जा व आर्थिक क्षेत्रातील दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. अमित पटनी यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी विज्ञान, नैतिक मूल्ये आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन यांचाचे अद्वितीय संयोजन भारतातील उदयोन्मुख औषध निर्मिती क्षेत्रात घेऊन येत आहे.

रे निओ फार्मा अँटीबायोटिक्स, मधुमेहविरोधी औषधे, गॅस्‍ट्रो-इंटेस्टिनल उत्पादने, वेदना व ऑर्थोपेडिक व्यवस्थापन, एलर्जी व श्वसन विकार, हृदयविकार, त्वचाविकार, प्रोटॉन पंप इनहिबिटर्स यांसह इतर अनेक व्यापक उपचार क्षेत्रांमध्ये सेवा प्रदान करते. कंपनी सामान्य आणि विशिष्ट गरजा पूर्ण करणाऱ्या अचूक फॉर्म्युलेशन्ससह ब्रँडेड जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे, तसेच या औषधांची कार्यक्षमता आणि सुरक्षितता यावर विशेष भर आहे.

बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्‍ली-एनसीआर, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा, तेलंगणा व आंध्रप्रदेश यांसारख्या दाट लोकवस्तीच्या व प्रभावशाली राज्यांमध्ये रे निओ फार्माचे प्रबळ जाळे पसरलेले आहे. या राज्यांच्या माध्यमातून कंपनी भारतातील जवळपास ५५-६० टक्‍के व्‍यक्तींपर्यंत पोहोचत आहे, तसेच समुदायांना आवश्यक औषधे उपलब्ध करून देत आहे. ९९६७०५३९४५

रे निओ फार्माचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्‍यांच्‍या नेतृत्वाला पारंपारिक औषधनिर्माण क्षेत्राबाहेरील लाभलेला दांडगा अनुभव. कंपनीच्या प्रवर्तकांना व संचालकांना आर्थिक, मीडिया, माहिती तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर, खासगी इक्विटी, उत्पादन आणि ऊर्जा यांसारख्या विविध क्षेत्रांतील ५० वर्षांहून अधिक काळाचा यशस्वी वारसा लाभला आहे. या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी, प्रशासन आणि नवनिर्मितीसाठी केला जात आहे.

"आम्ही औषधनिर्माण क्षेत्राकडे केवळ एक व्यवसाय म्हणून पाहत नाही; तर आरोग्य सेवेच्या माध्यमातून शाश्वत विकास आणि राष्ट्र उभारणीच्या दिशेने केलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. रे निओ फार्मामध्ये आम्हाला माहित आहे की, आरोग्यसेवेचे भविष्य शास्त्रीय आणि कार्यात्मक स्वरूपाचे असण्‍यासह मानवी मूल्यांशी खोलवर जोडलेले आहे. औषधे पोहोचवण्यापलीकडे जाऊन विश्वास निर्माण करणे, पारदर्शकता जपणे आणि आरोग्यसेवा परिसंस्थेतील प्रत्येक घटकाशी अर्थपूर्ण नाते निर्माण करणे, याप्रती आम्‍ही कटिबद्ध आहोत," असे रे निओ फार्माचे संस्थापक अमित पटनी म्हणाले.

रे निओ फार्मा गतीमान व्यावसायिक मॉडेलवर आधारित आहे, ज्यामध्ये कंपनीचे स्वतःचे ब्रँडेड फॉर्म्युलेशन्स आणि आघाडीच्या उत्पादकांशी धोरणात्मक सहकार्य यांचा समावेश आहे. यामुळे गुणवत्तेची आणि सुरक्षिततेची कठोर मानके राखत नाविन्यपूर्ण उपचार पद्धती सहज उपलब्ध करून देणे शक्य होते. कंपनीची चपळ कार्यप्रणाली आरोग्याच्या बदलत्या गरजांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता शाश्वत वाढ सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. जागतिक सर्वोत्तम पद्धतींचा वापर, स्वदेशी संशोधन व विकासमधील गुंतवणूक आणि कुशल व्यावसायिक टीमच्या बळावर रे निओ फार्मा भारतातील डॉक्टर्स, आरोग्यसेवा प्रदाता आणि रुग्णांसाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून स्वतःला प्रस्थापित करत आहे.

आपल्या क्षेत्रात सर्वात वेगाने विस्तारणारा फार्मास्‍युटिकल पोर्टफोलिओ आणि नैतिक व रुग्ण-हित प्रथम या तत्त्वांवर आधारित पाया यामुळे रे निओ फार्मा भारताच्या आरोग्य क्षेत्रातील परिवर्तनामध्ये निर्णायक शक्ती बनण्यास सज्ज आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

अक्षयकल्प ऑर्गेनिकचा मुंबई आणि पुण्यात प्रवेश

दक्षिण भारतात सुरू झालेला भारताचा आघाडीचा प्रमाणित ऑर्गेनिक डेअरी ब्रँडचा प्रवास आता महाराष्ट्रासह राष्ट्रीय स्तरावर विस्तारत आहे  मुंबई। भारतातील आघाडीचा प्रमाणित ऑर्गेनिक डेअरी ब्रँड (सेंद्रिय दुग्धजन्य उत्पादन ब्रँड) अक्षयकल्प ऑर्गेनिकने आज मुंबई आणि पुणे बाजारपेठेत अधिकृत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. दक्षिण भारतातील लोकप्रिय ब्रँडपासून संपूर्ण भारतातील घराघरात पोहोचण्याच्या त्यांच्या प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 2010 मध्ये स्थापन झालेल्या आणि स्वच्छ पोषण व शेतकरी सक्षमीकरण या दोन तत्त्वांवर उभारलेल्या अक्षयकल्प ऑर्गेनिककडून महाराष्ट्रात त्यांच्या प्रमाणित सेंद्रिय दुग्धजन्य उत्पादनांचा संपूर्ण संच उपलब्ध करून दिला जात आहे. यामध्ये दूध, तूप, दही, लोणी, पनीर, चीज, ताक तसेच त्यांची वेगाने वाढणारी उच्च-प्रथिनांची श्रेणी यांचा समावेश आहे. ही सर्व उत्पादने अँटिबायोटिक्स, कृत्रिम हार्मोन्स, कीटकनाशकांचा उरलेला साका किंवा गाळ, अन्न खराब होऊ नये, जास्त काळ टिकावे आणि त्याची गुणवत्ता कायम राहावी यासाठी वापरली जाणारी संरक्षक द्रव्ये आणि कृत्रिम अॅडिटिव्ह्सपासून ...

सॅमसंगने शुभ अक्षय्य तृतीया सेलची घोषणा केली

बीस्‍पोक एआय होम अप्लायन्सेसवर आकर्षक उत्‍सवी ऑफर्स  मुंबई। सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आपल्या शुभ अक्षय्य तृतीया सेलची घोषणा केली आहे. या सेलच्या निमित्ताने सॅमसंगच्या बीस्‍पोक एआय होम अप्लायन्सेसवर आकर्षक उत्‍सवी ऑफर्स देण्यात आल्या आहेत. समृद्धी आणि नवीन सुरुवातीचा उत्सव साजरा करण्यासाठी डिझाइन केलेल्या या ऑफर्स ग्राहकांना खात्रीशीर बचतीसह दीर्घकालीन मूल्य प्रदान करतात, ज्यामुळे ग्राहकांना अधिक स्मार्ट आणि एआय आधारित जीवनशैलीकडे अपग्रेड करणे सोपे होईल. सॅमसंग आपल्या बीस्‍पोक एआय अप्‍लायन्‍सेसवर विशेष फायदे देत आहे, ज्यामध्ये रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, एअर कंडिशनर्स आणि मायक्रोवेव्हवर जवळपास २०,००० रूपयांपर्यंत कॅशबॅक ऑफरचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकांना एअर कंडिशनर्सवर ५ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी आणि सॅमसंग केअर+ अंतर्गत ५ वर्षांची विस्तारित वॉरंटी देखील मिळू शकते. ग्राहकांना मनःशांती मिळावी, दुरुस्तीचा अनपेक्षित खर्च कमी व्हावा आणि वस्तू खरेदीचा एकंदरीत अनुभव सुखद व्हावा, हा या फायद्यांमागचा उद्देश आहे. या शुभ अक्षय्य तृ...

अनन्या दत्ता मॉडेलिंग आणि जाहिरात विश्वातील एक सुप्रसिद्ध चेहरा आहे

मुंबई/कोलकाता। अभिनेत्री अनन्या दत्ता सध्या तिच्या आगामी हिंदी चित्रपट 'जिंदगी फिर भी खूबसूरत है' मुळे चर्चेत आहे, ज्याचे चित्रीकरण सध्या शांतीकेतन फिल्म्सच्या बॅनरखाली सुरू आहे. हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे, कारण ती सध्या केवळ हिंदी चित्रपटांवर लक्ष केंद्रित करत आहे. अनन्या दत्ताने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'नाटोबार नॉट आऊट' या बंगाली चित्रपटातून केली, ज्यात तिने ज्येष्ठ अभिनेत्री रायमा सेन आणि मून मून सेन यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारून आपले कौशल्य दाखवले. त्यानंतर, तिने 'गॉड ओन्ली नोज' आणि 'डन्नो व्हाय ३' सारख्या चित्रपटांमधील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि प्रत्येक भूमिकेत एक वेगळी छाप सोडली. अनन्या दत्ता यांची नाट्यक्षेत्रातही एक समृद्ध कारकीर्द आहे, जिथे त्यांनी भरत दाभोळकर यांच्या 'बॉटम्स अप गँग'सोबत 'ओह नो, नॉट अगेन' (१५० हून अधिक प्रयोग), 'मंकी बिझनेस' (१०० हून अधिक प्रयोग), 'फनी थिंग कॉल्ड लव्ह', 'गॉट टू बी ऐश्वर्या' आणि ...